महाराष्ट्रात जुलैमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने अचानक ओढ दिल्याने शेतकरी आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होत असून, काही भागांत पावसाची तूट ५० टक्क्यांहून अधिक असल्याचे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघाली होती. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाचे चित्र पूर्णपणे बदलले असून अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्हे वगळता राज्यातील अनेक भागांमध्ये ऑगस्टमधील पावसाची स्थिती चिंताजनक आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पिकांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाची तूट वाढल्याने शेती संकटात पिकांच्या वाढीसाठी सध्या पावसाची गरज असताना