
ग्रामसभेदरम्यान होणाऱ्या त्रासाविरोधात राज्यभरातील सरपंच आणि ग्रामसेवक आक्रमक; पोलीस संरक्षणाची मागणी
प्रतिनिधी /उदय साळुंखे, अखिल भारतीय सरपंचांच्या वतीने एका पत्राद्वारे ग्रामपंचायतीच्या कामकाजातील अडचणी आणि वाढत्या दबावाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ग्रामविकास आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी एकीने काम करणे गरजेचे असताना, प्रशासनाकडून येणारे जादा ग्रामसभांचे आदेश आणि सोशल मीडियावरील अफवांमुळे अधिकाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.























































