
गांधीनगर/प्रतिनिधी: उदय साळुंखे,
वळीवडे ता.करवीर ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याच्या समस्येवर बातमी प्रसारित झाल्यानंतर, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गांधीनगर शहर अध्यक्ष सागर कोलप यांनी पुढाकार घेऊन या समस्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या जनआंदोलनामुळे प्रशासनाला खडबडून जाग आली आणि त्यांनी त्वरित परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. जनशक्ती आणि नेत्याच्या सजगतेचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.











