
गांधीनगर/प्रतिनिधी:उदय साळुंखे,
गडमुडशिंगीतील महिलावर्ग रोजगारासाठी दररोज गांधीनगरला कामासाठी जात असतात. मात्र, पावसाळ्यात तिथे ओढ्याचे पाणी साचून—जिथे चिखल आणि प्रचंड—त्यांना नाईलाजास्तव रेल्वे रुळांवरून जावे लागते. रेल्वे रुळांवरून चालताना याआधीही अनेक अपघात घडले आहेत. आता या जीवघेण्या प्रवासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि सुरक्षेची काळजी घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर एक योग्य रस्ता किंवा मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी तीव्र मागणी होत आहे.











