
कोल्हापूर, दि. २७ जून २०२६ : ग्रामीण भारतातील डिजिटल कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने bsnl.co.in� ने भारतनेट अंतर्गत समाविष्ट गावांमधील कुटुंबांसाठी अवघ्या ₹२५९ प्रति महिना दराचा ‘रूरल फायबर एंट्री प्लान’ सुरू केला आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना घरबसल्या हाय-स्पीड फायबर-टू-द-होम (FTTH) ब्रॉडबँड सेवा उपलब्ध होणार आहे.
सुधारित भारतनेट कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश ग्रामीण कुटुंबांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे शिक्षण, व्यवसाय, ई-सेवा, डिजिटल व्यवहार आणि मनोरंजनासाठी ग्रामीण भागाला मोठा आधार मिळणार आहे.
प्लानची प्रमुख वैशिष्ट्ये
दरमहा ७०० जीबी हाय-स्पीड डेटा
२५ Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड
संपूर्ण भारतात अमर्यादित मोफत व्हॉईस कॉलिंग
मोफत इन्स्टॉलेशन व ओएनटी/मोडेम सुविधा
‘वेव्हज’ (Waves) OTT चे मोफत सबस्क्रिप्शन
ऑनलाइन बुकिंगची सोपी सुविधा
ग्राहक ruralftth.bsnl.in� या संकेतस्थळावर जाऊन काही सोप्या टप्प्यांत नवीन कनेक्शनसाठी अर्ज करू शकतात. तसेच अर्जाची सद्यस्थितीही ऑनलाइन तपासता येणार आहे.
अधिक माहितीसाठी किंवा चौकशीसाठी १८०० ४४४४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच याच क्रमांकावर व्हॉट्सॲपवर “Hi” संदेश पाठवूनही माहिती मिळवता येणार आहे.
याबाबत बोलताना Harinder Kumar यांनी सांगितले की, “प्रत्येक ग्रामीण नागरिकाला हाय-स्पीड आणि विश्वासार्ह ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळावा यासाठी बीएसएनएल कटिबद्ध आहे.”
ग्रामीण भागातील डिजिटल सक्षमीकरणाला चालना देणारी ही योजना इंटरनेट सेवांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास महत्त्वाची ठरणार आहे. “भारताला जोडणे, ग्रामीण भारताला सक्षम बनवणे” या ध्येयाने बीएसएनएलने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.












