Edition

नेपाळला महापुराचा महाघात! मृतांचा आकडा १२०० पार; ४ हजारांहून अधिक बेपत्ता

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

त्रिभुवन रुग्णालयाबाहेर आक्रोश; मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण — नेपाळकडून ‘क्लायमेट जस्टिस’ची मागणी.

काठमांडू वृत्तसेवा : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी अचानक पुरामुळे संपूर्ण देश हादरला असून, मृतांचा आकडा १२००च्या पुढे गेला आहे. तर ४ हजारांहून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सुरक्षा दल, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडून ढिगाऱ्यांमध्ये शोधमोहीम सुरू असून, बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबीयांची प्रतीक्षा आता असह्य होत आहे.
काठमांडूतील त्रिभुवन रुग्णालयाबाहेर शोककळा पसरली आहे. रुग्णालयाच्या परिसरात बेपत्ता व्यक्तींची छायाचित्रे लावण्यात आली असून, नातेवाईक आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहेत. पुराला आठवडा उलटूनही अनेक मृतदेहांची ओळख पटलेली नाही. केवळ त्रिभुवन रुग्णालयात १६१हून अधिक मृतदेह अद्याप अनोळखी आहेत.
संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेता काही भागांत मृतदेहांवर तात्पुरते दफनविधी केले जात आहेत. नुवाकोटसारख्या अतिप्रभावित जिल्ह्यांत त्रिशूली नदीकाठी कुशा-गवतापासून प्रतीकात्मक पुतळे तयार करून सांकेतिक अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीयांवर आली आहे.
दरम्यान, या आपत्तीचा संबंध हवामान बदलाशी जोडत नेपाळने विकसित राष्ट्रांकडे **‘क्लायमेट जस्टिस’**ची मागणी केली आहे. जागतिक तापमानवाढीस नेपाळचा अत्यल्प वाटा असूनही त्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत राहिल्यास दक्षिण आशियातील अब्जावधी लोकांच्या पाणी सुरक्षेवर गंभीर संकट निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!