गांधीनगर/प्रतिनिधी: उदय साळुंखे, गडमुडशिंगी ता. करवीर फाट्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे आणि अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या दुचाकींमुळे व चार चाकी स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक प्रचंड त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने बेशिस्तपणे लावल्याने रस्ते अरुंद झाले आहेत, ज्यामुळे एसटी बसेस व इतर अवजड वाहनांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. भररस्त्यातून चालणाऱ्या पादचाऱ्यांमुळे अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी आणि अनधिकृत पार्किंग हटवण्यासाठी त्वरित प्रशासकीय कारवाईची गरज आहे.











