गांधीनगर/प्रतिनिधी:
उदय साळुंखे
गांधीनगर ता.करवीर येथील स्मशानभूमी सध्या गंभीर दुरवस्थेचा सामना करत आहे. परिसरात कचरयाचे ढीग साचलेले असून, ठिकठिकाणी उगवलेल्या तणकाटामुळे अस्वच्छतेत भर पडत आहे.
स्मशानभूमीच्या पाऊलवाटावर शेवाळ साचल्याने पाय घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत, तर बसण्याची कोणतीही सोय उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईकांना तासनतास उभे राहावे लागत आहे. याशिवाय, भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाने तातडीने स्वच्छता व दुरुस्तीची कामे करावीत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.











