Edition

सर्पमित्र हेमंत भोसले यांचे वळीवडे गावात मोलाचे कार्य.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी उदय साळुंखे,

वळीवडे ता.करवीर गावातील सर्पमित्र हेमंत भोसले यांचे कार्य आता संपूर्ण पंचक्रोशीत कौतुकाचा विषय बनले आहे. गावामध्ये कोणत्याही कोपऱ्यात साप निघाल्यास, ग्रामस्थ क्षणाचाही विलंब न करता हेमंत यांना संपर्क करतात, आणि ते ताबडतोब मदतीला धावून जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी शेकडो विषारी व बिनविषारी साप पकडून त्यांना सुरक्षितपणे जंगलामध्ये सोडून दिले आहे. त्यांच्या या धाडसी वृत्तीमुळे लोकांमध्ये सापांविषयीची भीती कमी झाली असून, अनेक सर्पांचे प्राण वाचले आहेत. हेमंत यांचे हे निस्वार्थ कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!