गांधीनगर:प्रतिनिधी उदय साळुंखे
“गडमुशिंगी फाट्याजवळ ता. करवीर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिकांच्या जीवाला धोका. गडमुशिंगी फाटा परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यामुळे सकाळी फिरणाऱ्या नागरिकांसह येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आणि टू-व्हीलर्सच्या मागे कुत्री धावण्याचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे, त्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे.”











