
गांधीनगर/प्रतिनिधी:
उदय साळुंखे
वळीवडे ता.करवीर परिसरातील राधास्वामी बस स्टॉप ते हुल्लेमळा कॉर्नरदरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीवघेणा धोका निर्माण झालाय. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातंय. आता तरी लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी जोर धरू लागली आहे,











