Edition

पत्रकारांना धमकावणे म्हणजे लोकशाहीला आव्हान; दोषींना कोणतीही माफी नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव
वाशिम: दि. 22 जून राज्यातील पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे अथवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे यासारख्या घटनांकडे सरकार अत्यंत गांभीर्याने पाहत असून अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकार आणि माध्यमे हे चौथे स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न, जनतेच्या समस्या आणि शासनाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करतात. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले, धमक्या किंवा दबाव टाकण्याचे प्रकार हे केवळ व्यक्तीवरचे हल्ले नसून लोकशाही व्यवस्थेवरील थेट आघात आहेत.
राज्यात पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, त्यांना संरक्षण मिळावे आणि दोषींवर तातडीने कारवाई व्हावी यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येतील, तसेच कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक दबावाला बळी न पडता दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
पत्रकार संघटना आणि माध्यम प्रतिनिधींनी मुख्यमंत्री यांच्या भूमिकेचे स्वागत करत पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांचे ठोस निर्देश :
🔹 पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
🔹 गुन्हे दाखल करून संबंधित आरोपींना तातडीने अटक करावी.
🔹 प्रकरणांची द्रुतगतीने सुनावणी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
🔹 पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.
🔹 पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा निर्माण करावी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पत्रकारांना धमकी देणे म्हणजे लोकशाहीला आव्हान देणे होय. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही माफी दिली जाणार नाही. माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही सरकारची जबाबदारी असून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध आहे.”

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!