वाई प्रतिनिधी – के. एस. आय. पब्लिकेशन (महाराष्ट्र राज्य) आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ वे राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी संमेलन व पुरस्कार सोहळा २०२६ रविवार, दिनांक ७ जून रोजी गरवारे सभागृह, लोकमान्य टिळक ग्रंथालय, वाई येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून दिग्गज कवी, कवयित्री, साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिग्गजांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन
लेखक विलास खरात यांच्या हस्ते तर कवयित्री सौ सुजता घोरपडे वाई यांच्या हस्ते छ शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या संमेलनाचे अध्यक्षपद नवीन पनवेल (रायगड) येथील प्रसिद्ध साहित्यिक मा. नागनाथ श्रीपती डोलारे यांनी भूषविले, तर विद्यानिकेतन संस्थेचे मा. श्री. शशिकांत कोंचळे यांनी प्रास्ताविक करून स्वागताध्यक्ष म्हणून सर्वांचे स्वागत केले. तसेच कवी सरकार इंगळी यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. श्रीकांत पाटील (घुणकी) यांनी लेखकांना मोलाचे मार्गदर्शन केले.आटपाडीच्या मान्यवरांचा व साहित्यिकांचा गौरव
या सोहळ्यात आटपाडी तालुक्याचे विशेष नाव गाजले. प्रमुख उपस्थिती म्हणून लक्षतारा न्यूज चॅनेलचे संपादक मा. श्री. सचिन विष्णू वाघमारे यांचा आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यासोबतच आटपाडी येथून आलेले श्री. यशवंत मोटे, श्री. सागर मोटे आणि श्री. संतोष मोटे यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पुस्तकांचे प्रकाशन आणि नागनाथ डोलारेयांच्या जन्मदिवस तसेच विकास घोणे व त्यांच्या पत्नी यांचा लग्नाचा वाढदिवस असा अनोखा सोहळा साजरा करण्यात आला
संमेलनात अनेक मान्यवर लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने:श्री. भारत कवितके यांचा ‘शृंगारिक लावणी संग्रह ‘श्री. सुधाकर बाबुराव शिंदे यांचा ‘गावकुस’ ग्रामीण कथासंग्रह श्री. विजय मोटे यांचा ‘मानवतावादी’ काव्यसंग्रह आणि साहित्य संमेलन विशेषांक प्रकाशन करण्यात आले संमेलनाध्यक्ष डोलारे यांच्यातर्फे उपस्थितांना स्वलिखित पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.दोन सत्रांतील बहारदार कार्यक्रम आणि सादरीकरण दोन सत्रांत चाललेल्या या संमेलनाचे सूत्रसंचालन सौ. विद्या थोरात-काळे (विजू, मुंबई) यांनी केले, तर मुख्य काव्यसंमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री दिपक पवार सर रुकडी यांनी केले द्वितीय सत्र: या सत्रात अहिल्यानगरचे प्रसिद्ध कथाकथनकार श्री. बाळासाहेब देशमुख यांनी आपल्या बहारदार शैलीत कथाकथन करून उपस्थितांची मने जिंकली. व मनोगत: सौ. विद्या थोरात-काळे यांनी ‘मर्मबंध’ कादंबरीविषयी आपले अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.
नृत्यकला: नृत्यकलाकार श्री. अनिल दानोळे (दिवानजी) यांनी सादर केलेल्या ‘जोगवा नृत्याने’ कार्यक्रमात रंगत आणली.राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ३० पेक्षा जास्त दिग्गज कवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये तासगावचे विजय तानाजी पाटील, पनवेलच्या प्रा. सौ. श्रद्धा तारे, गोव्याचे संतोष चिले, अनेक मान्यवरांना सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. कवी संमेलनात
कोल्हापूर परांडा कराड सातारा पुणे पनवेल मुंबई वाई अहिल्यानगर महाड खाली भागातून ४० हून अधिक कवींनी आपल्या कविता सादर केल्या .या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विद्यानिकेतन संस्थेचे शशिकांत कोंचळे व के. एस. आय. पब्लिकेशनच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. शेवटी आयोजकांनी सर्व सहभागी साहित्यिक व रसिकांचे आभार मानून संमेलनाची सांगता केली.

वाई प्रतिनिधी – के. एस. आय. पब्लिकेशन (महाराष्ट्र राज्य) आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ वे राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी संमेलन व पुरस्कार सोहळा २०२६ रविवार, दिनांक ७ जून रोजी गरवारे सभागृह, लोकमान्य टिळक ग्रंथालय, वाई येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून दिग्गज कवी, कवयित्री, साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








