ईश्वरपुर प्रतिनिधी – भारत सरकार, गृह मंत्रालय
यांच्यावतीने अपर उप आयुक्त मनिषा नलावडे यांना अति उत्कृष्ट सेवा पदकजाहीर करण्यात आले आहे.
दीर्घकालीन व निष्कलंक सेवेसाठी भारत सरकार, गृह मंत्रालय यांच्याकडून हा मानाचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. हा सन्मान पोलीस महासंचालक यांच्या हस्ते लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. ए.सी.पी.मनिषा नलावडे यांना हा पोलीस खात्यातील अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमती नलावडे म्हणाल्या, हा सन्मान माझ्यासाठी , पोलीस खात्यासाठी आणि गावासाठी गौरवास्पद आहे. सातत्याने ,निर्भयतेने आणि समरसतेने केलेल्या कामाची ही पोहोच पावती आहे.या पदकामुळे भविष्यात ही अधिक सक्षमपणे पोलीस खात्यात काम करणार आहे.
यावेळी माजी सरपंच रंगराव बाबुराव जाधव , राजाराम बापू पाटील बॅंकेचे संचालक संभाजी आनंदराव पाटील, माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विलास गणपती पाटील ,मधुकर गणपती पाटोळे ,प्रकाश सदाशिव नलावडे, बाळासाहेब राऊ वाजे, मिलिंद बाळासो वाजे,
शिव समर्थ बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश प्रकाश नलावडे, संदीप गुणवंत वाजे, रमेश सदाशिव जाधव, नितीन भिमराव माने , अविनाश रघुनाथ कोकाटे , गणेश विलास कोकाटे, सुशांत राजाराम जाधव ,संजय विष्णू शेवाळे डॉ.महेश बबन वाजे, अभिजीत मधुकर पाटील,यश वसंत लोटे, विघ्नेश उत्तम जाधव, विलासराव कोळेकर,
ऋतुजा प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.











