गांधीनगर प्रतिनिधी- उदय साळुंखे,
दि.२६ छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात दि.२६ जुलै १९०२ रोजी मागासवर्गीयांसाठी ५० टक्के सरकारी नोकऱ्यांचे आरक्षण लागू केले त्यामुळे बहुजन समाजाला प्रशासनात स्थान मिळाले सामाजिक समता प्रस्थापित झाली आणि शिक्षणाला व आत्मसन्मानाला प्रोत्साहन मिळाले आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी मानाचा मुजरा असे मत भीमराव गोंधळी रिपब्लिकन सेना करवीर अध्यक्ष यांनी व्यक्त केले, नोकरीमध्ये संधी मिळाल्याने समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढले महाराजांनी विविध जातीसाठी वस्तीगृहे सुरू केली त्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्याची व शिकण्याची सोय झाली. असे मत अर्जुन कांबळे यांनी व्यक्त केले, वंचितांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना समाजात मान सन्मानाचे जीवन मिळवून दिले, असे मत अर्जुन गोंधळी यांनी व्यक्त केले आणि कार्यक्रमाचे आभार मानले
यावेळी उपस्थित
शिवाजी कांबळे, संदिप गोंधळी,राजू जाधव,दिपक डोणे, उपस्थित होते










